Home Blog

ठिय्या आंदोलनाचा इशाऱ्यानंतर तातडीने डीपी मंजूर! -धानोरा दोन येथे १०० केव्हीए तर कडू-पोजगे आणि दहेगाव धानोरा येथे ६३ केव्हीएची डीपी लावली. -प्रशांत कांबळे यांच्या आंदोलनाला यश; प्रशासनाने घेतली दखल

ठिय्या आंदोलनाचा इशाऱ्यानंतर तातडीने डीपी मंजूर!
-धानोरा दोन येथे १०० केव्हीए तर कडू-पोजगे आणि दहेगाव धानोरा येथे ६३ केव्हीएची डीपी लावली.
-प्रशांत कांबळे यांच्या आंदोलनाला यश; प्रशासनाने घेतली दखल

तिवसा: तालुक्यातील १५ गावातील शेतकऱ्यांनी ओव्हरलोड डीपी दुरुस्ती किंवा नवीन डीपी देण्याची मागणी शुक्रवारी ता.२८ नोव्हेंबर रोजी केली होती. मागणीनंतरही तीन दिवस होऊन कारवाई झाली नाही. परिणामी दहेगाव धानोरा डीपीचे ऑइल लिकेज होऊन पेट घेतल्याची घटना रविवारी झाली. यासंदर्भातील माहिती उपकार्यकारी अभियंता अधिकाऱ्यांना माहिती देऊन सोमवारी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी दिला होता. परिणामी उपकार्यकारी अभियंता निलेश उईके यांनी आंदोलची दखल घेऊन तातडीने धानोरा दोन येथे १०० केव्हीए तर कडू-पोजगे आणि दहेगाव धानोरा येथे ६३ केव्हीएचा डीपी बसवण्याचे आदेश दिले.

धोत्रा, शिरजगाव मोझरी गावातील शेतकऱ्यांचे कृषी पंप दहेगाव धानोरा डीपीवर आहे. गेल्या १५ दिवसांपासून या डीपीवरील नादुरुस्तीमुळे शेतकऱ्यांचे रब्बीचे पिक संकटात सापडले होते. हरभरा, गहू आणि पालेभाज्याचे पिकांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकरी अडचणीत सापडला होता. सोमवारी (ता.१) रोजी शेतकऱ्यांनी पुन्हा उपकार्यकारी अभियंता निलेश उईके यांना निवेदन देऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत डीपी घटनास्थळावर जात नाही तोपर्यंत कार्यालयातून ठिय्या सोडणार नसल्याची भूमिका प्रशांत कांबळे यांनी घेतली होती.

परिणामी उपकार्यकारी अभियंता उईके यांनी तातडीने फोनद्वारे संपर्क करून तातडीने डीपी बसवण्याच्या सूचना दिल्या सोमवारी दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या या ठिय्या आंदोलनानंतर अर्ध्या तासातच उपकार्यकारी अभियंता उईके यांनी जिल्हा कार्यालयांशी संपर्क करून ६३ केव्हीए डीपी तातडीने लावण्याचे आदेश दिल्याने धोत्रा, शिरजगाव मोझरी गावच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून प्रशांत कांबळे यांनी ठिय्या आंदोलनातून माघार घेतली. यावेळी विजय कुरळकर, एड.विकास तुरकाने, धोत्रा ग्रामपंचायत सरपंच भूषण गाठे, स्वप्नील तुरकाने, अमोल बेंद्रे, प्रभाकर वावरे, भाऊराव वैद्य, सुरेंद्र वाहने या शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

दवलामेटीमध्ये संविधान दिवसानिमित्त भिम शक्ती युवामंचतर्फे दोन दिवसीय समाजप्रबोधन कार्यक्रम

दवलामेटीमध्ये संविधान दिवसानिमित्त भिम शक्ती युवामंचतर्फे दोन दिवसीय समाजप्रबोधन कार्यक्रम
दवलामेटी | WH NEWS प्रतिनिधी
भिम शक्ती युवामंच दवलामेटीच्या वतीने 2014 पासून सातत्याने संविधान दिवसानिमित्त समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याच परंपरेनुसार याही वर्षी 26 व 27 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत समोरील मैदानावर दोन दिवसीय व्याख्यान व भिमगीत समाजप्रबोधन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

पहिला दिवस : 26 नोव्हेंबर संविधान व बाबासाहेबांवरील व्याख्यान
पहिल्या दिवशी व्याख्याते मा. जितेंद्र दादा आसोले यांनी “संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात महामानव बुद्ध, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, माता सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि साहित्यारत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना तसेच मालेगाव,नाशिकमधील चिमुकली यज्ञा जगदीश दुसाने हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राजेश तटकरे, वरिष्ठ पोलीस अधिकारी वाडी पोलिस स्टेशन होते. अध्यक्षस्थानी ममताताई धोपटे, माजी जि.प. सदस्य होत्या. प्रमुख उपस्थितीत माजी सरपंच रिताताई उमरेडकर, रक्षाताई सुखदेवे, सरला चिमोटे, ग्रामविकास अधिकारी माधुरीताई खोब्रागडे तसेच प्रतिष्ठित समाजसेवकांची उपस्थिती होती.

दुसरा दिवस : 27 नोव्हेंबर – ‘भिमक्रांतीचा बुलंद आवाज’ विकास राजा यांचे भिमगीत समाजप्रबोधन
दुसऱ्या दिवशी विकास राजा यांच्या भिमगीत समाजप्रबोधन कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले. सामाजिक जागृतीचे संदेश देणाऱ्या गीतांनी उपस्थितांना प्रेरित केले.
या कार्यक्रमात ममताताई धोपटे, सरपंच गजानन रामेकर, रिताताई उमरेडकर, छायाताई खिल्लारे, रक्षाताई सुखदेवे, रोशन मेश्राम यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे यश वाढवले. विशेष सहयोग कैलास बन्सोड, तिरुपती गद्दमवार, भारत सहारे, पवन गुरव, स्कायटेक बिल्डकॉनचे आकाश भारद्वाज, राकेश निकोसे यांनी दिला.
कार्यक्रमाचे आयोजन
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिम शक्ती युवामंचचे निकेश सुखदेवे, स्वप्निल चारभे, शुभम भालाधरे, समीर सहारे, शुभम गजभिये, अमोल भातुकुलकर, सौरभ नाईक, संगीत करार, राहुल मोडघरे, रोहित राऊत, उमेश सुखदेवे, राज बागडे, वैभव तिरपुडे, विनय गवई, राजू ढोके आणि सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक रिताताई उमरेडकर यांनी केले तर संचालन उषाताई चारभे यांनी केले.आभार : शुभम भालाधरे वैभव तिरपुडे यांनी मानले.
गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
दोन दिवसीय कार्यक्रमाला दवलामेटी ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद देत समाजप्रबोधनाच्या या उपक्रमाला भरभरून दाद दिली.

वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरमध्ये अत्याधुनिक रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सुरुवात रुग्णांना पुन्हा वेदनारहित चालण्याची नवी संधी मिसो रोबोटिक सिस्टीममुळे जागतिक दर्जाचे ऑर्थोपेडिक (हाडांचे) तंत्रज्ञान आता आपल्या शहरातच उपलब्ध झाले आहे. ज्याचा फायदा नागपूर, विदर्भ आणि मध्यप्रदेशातील रुग्णांना होईल.

वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरमध्ये अत्याधुनिक रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सुरुवात
रुग्णांना पुन्हा वेदनारहित चालण्याची नवी संधी
मिसो रोबोटिक सिस्टीममुळे जागतिक दर्जाचे ऑर्थोपेडिक (हाडांचे) तंत्रज्ञान आता आपल्या शहरातच उपलब्ध झाले आहे. ज्याचा फायदा नागपूर, विदर्भ आणि मध्यप्रदेशातील रुग्णांना होईल.
नागपूर, 26 नोव्हेंबर 2025: अत्यंत अचूक आणि रुग्ण-केंद्रित आरोग्यसेवेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूरने मिसो रोबोटिक सिस्टीमसह आपला “कॉम्प्रिहेन्सिव्ह अॅडव्हान्स्ड रोबोटिक नी रिप्लेसमेंट प्रोग्राम” सुरू केला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित आणि कमी वेदनादायी होते. त्यामुळे गुडघ्याच्या तीव्र संधिवाताने आणि सांध्यांच्या झिजेमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना लवकर बरे होण्यास मदत होते आणि त्यांच्या चालण्याची क्षमता सुधारते.

हा कार्यक्रम विदर्भासाठी एक महत्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ आणि मध्यप्रदेशातील जबलपूर, छिंदवाडा यासारख्या शहरांमध्ये रुग्णांना जागतिक दर्जाचे हाडांविषयी (ऑर्थोपेडिक) उपचार सेवा मिळू शकणार आहे. या रोबोटिक सिस्टीममुळे वोक्हार्ट हॉस्पिटल रुग्णांना कमी दुखापतीची शस्त्रक्रिया आणि लवकर बरे होण्याची सुविधा देऊन त्यांना वेदनाशिवाय आणि आत्मविश्वासाने आपल्या दैनंदिन आयुष्यात परत येण्यास मदत करेल.

कॉम्प्रिहेन्सिव्ह अॅडव्हान्स्ड रोबोटिक नी रिप्लेसमेंट प्रोग्रामचा भाग म्हणून, वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूर रुग्णांना शस्त्रक्रियापूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर सुरक्षित आणि सुलभ काळजी देते. रुग्णांची सविस्तर वैद्यकीय तपासणी, डिजिटल इमेजिंग आणि रोबोटिक नियोजन करून प्रत्येक शस्त्रक्रिया रुग्णाच्या वैयक्तिक गरजेनुसार केली जाते. शस्त्रक्रियेनंतर, लवकर बरे होण्यासाठी लवकर हालचाल, वेदना नियंत्रण आणि नियोजित फिजिओथेरपीवर विशेष लक्ष दिले जाते. वैयक्तिक फिजिओथेरपी सत्रांमुळे रुग्णांची ताकद, संतुलन आणि चालण्याची क्षमता सुधारते, ज्यामुळे ते आपल्या दैनंदिन कामकाजात लवकर आणि आत्मविश्वासाने परत येऊ शकतात.

या कार्यक्रमाचे उद्घाटन वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर सुश्री जहाबिया खोराकीवाला, वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे ग्रुप सीईओ डॉ. पराग रिंदानी, आणि वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरचे सेंटर हेड श्री. रवी बाघली यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमात या क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांनी आपले मार्गदर्शन केले, ज्यामध्ये डॉ. रोमिल राठी, डॉ. मुकुंद अग्रवाल, डॉ. लघवेंदु शेखर, डॉ. आशिष ठाकूर, डॉ. स्वप्नील गाडगे, डॉ. शांतनू देशमुख आणि डॉ. अंबर दावरे हे रोबोटिक ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन उपस्थित होते.
रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणाचे प्रमुख फायदे आणि वैशिष्ट्ये
मिसो रोबोटिक सिस्टीममुळे वोक्हार्ट हॉस्पिटल्स अचूक ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. हे रुग्णांना अनेक फायदे देते, जसे की:
• इम्प्लांट बसवताना अधिक अचूकता आणि योग्य संरेखन
• मांसपेशींना कमी इजा आणि शस्त्रक्रियेतील रक्तस्राव कमी
• शस्त्रक्रियेनंतर वेदना कमी होतात आणि लवकर रिकव्हरी होते
• रुग्णालयात राहण्याचा वेळ कमी होतो, ज्यामुळे रुग्ण लवकर दैनंदिन जीवनात परत येऊ शकतात
• तसेच इम्प्लांट जास्त काळ टिकतो ज्यामुळे चालण्याची क्षमता सुधारते आणि दीर्घकालीन समाधान मिळते.
प्रगत 3D व्हिज्युअलायझेशन आणि शस्त्रक्रियेच्या वेळेची माहिती वापरून हे रोबोटिक सिस्टीम प्रत्येक रुग्णाच्या गुडघ्याच्या रचनेनुसार शस्त्रक्रिया व्यक्तिगत पद्धतीने करण्यास सक्षम बनते. त्यामुळे हाडांची कापणी अचूक होते आणि सांध्यातील लिगामेंट्स योग्य संतुलनात राहतात, ज्यामुळे उपचारांचे परिणाम अधिक दीर्घकाल टिकतात.
सुश्री जहाबिया खोराकीवाला, मॅनेजिंग डायरेक्टर, वोक्हार्ट हॉस्पिटल्स म्हणाल्या:“वोक्हार्टमध्ये आमचे उद्दिष्ट नेहमीच तंत्रज्ञानासोबत रुग्णांची काळजी घेऊन सर्वोत्तम आरोग्यसेवा देणे आहे. नागपूरमध्ये रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण सुरू करणे म्हणजे मध्य भारतातील रुग्णांना अत्यंत अचूक आणि कमी दुखापतीची शस्त्रक्रिया त्यांच्या स्वतःच्या शहरात उपलब्ध करून देण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
डॉ. पराग रिंदाणी, ग्रुप सीईओ, वोक्हार्ट हॉस्पिटल्स म्हणाले:“रोबोटिक्स हा ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेचा भविष्यातला मार्ग आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण फक्त शस्त्रक्रियेची अचूकता वाढवत नाही तर रुग्णांच्या बरे होण्याच्या अनुभवालाही सुधारतो. ही प्रगती आमच्या वैद्यकीय उत्कृष्टतेच्या बांधिलकीची पुष्टी करते आणि ज्या प्रत्येक भागात आम्ही सेवा देतो तिथे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या आमच्या दृष्टीकोनाची खात्री देते.”

श्री. रवी बाघली, सेंटर हेड, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर म्हणाले:“ मिसो रोबोटिक सिस्टीमची सुरवात नागपूर आणि विदर्भासाठी अभिमानाचा क्षण आहे. आता रुग्णांना अत्याधुनिक गुडघा उपचारांसाठी मेट्रो शहरांमध्ये जाण्याची गरज नाही. ते आता येथेच, नागपूरमध्ये, जागतिक दर्जाची रोबोटिक शस्त्रक्रिया करू शकतात, ज्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो आणि परिणाम चांगले मिळतात.”
About Wockhardt Hospital:
Wockhardt Hospitals is a chain of tertiary care super-specialty hospitals with facilities in, Nagpur, Rajkot, South Mumbai and North Mumbai. All Wockhardt Hospitals have state-of-the-art infrastructure and globally benchmarked processes to enable Patient Care & Safety. Wockhardt Hospitals Ltd. is one of the few professionally managed corporate hospital groups in the country which prioritises patient safety and quality of care at the core of its strategy. The overall 1100 bedded hospitals & has over 1000 Standard Operating Procedures or Protocols for both clinical and non-clinical processes in place. The guiding philosophy is to serve and enrich the Quality of Life of patients.

वाडी नगर परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला धक्का ! हर्षल काकडे यांनी अचानक अर्ज मागे घेतल्याने ‘वाडीत सर्वात मोठा राजकीय स्फोट’ भाजप,काँग्रेस आमने-सामने, उबाठा गटात खळबळ,वाडीच्या राजकारणात मोठा भूचाल!

वाडी नगर परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला धक्का !
-हर्षल काकडे यांनी अचानक अर्ज मागे घेतल्याने ‘वाडीत सर्वात मोठा राजकीय स्फोट’
-भाजप,काँग्रेस आमने-सामने, उबाठा गटात खळबळ,वाडीच्या राजकारणात मोठा भूचाल!
वाडी प्रतिनिधी WH NEWS 
वाडी नगर परिषद निवडणुकीत शुक्रवारचा दिवस अक्षरशः सुपर पॉलिटिकल थ्रिलर ठरला. कारण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट – उबाठा) चे आक्रमक, भक्कम आणि सर्वात चर्चित चेहरे म्हणून ओळखले जाणारे हर्षल काकडे यांनी अचानक नगराध्यक्षपदाचे नामांकन मागे घेतले. ही बातमी समोर येताच उद्धव ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आणि संपूर्ण वाडीच्या राजकारणात भू-स्खलन सुरू झाले.

ज्या काकडे यांना उबाठाचा सर्वात मजबूत चेहरा, सर्वात आक्रमक उमेदवार मानले जात होते, त्या काकडे यांनी अचानक मागे हटणे म्हणजे निवडणुकीचे तापमान थेट उकळीवर पोहोचले.
आता सर्वात मोठा प्रश्न?
हर्षल काकडे यांनी पर्चा शेवटच्या क्षणी कोणासाठी सोडला? कोणत्या दबावात? की एखाद्या मोठ्या डीलचा भाग म्हणून?
हा प्रश्न वाडीच्या चहाच्या टपऱ्यांपासून ते सोशल मीडियापर्यंत आगीसारखा पसरला आहे.
अलीकडील मुलाखतीत म्हणाले होते – “मी मागे हटणार नाही!”
काही दिवसांपूर्वी एका युट्युब न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत काकडे म्हणाले होते की ते कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार आणि मागे हटणार नाहीत.
परंतु, अचानक झालेल्या या ‘पलटी’ने संपूर्ण वाडी स्तब्ध झाली आहे.

अलीकडेच केलेल्या काकडे यांच्या वाढदिवसाच्या शक्तीप्रदर्शनाने त्यांची ताकद दाखवली होती. हजारो लोकांच्या उपस्थितीत झालेला शो राजकीय दबाव निर्मिती म्हणून पाहिला गेला. पण, त्याच काकडे यांनी नामांकन मागे घेतल्यानंतर वाडीच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
‘बॅकडोर डील’च्या चर्चांना उधाण – राजकीय गलियारांमध्ये तापलेले वातावरण
काकडे यांची भाजप आमदार समीर मेघे यांच्याशी जवळीक सर्वश्रुत आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्यात प्रश्न उपस्थित केला जात आहे
हा निर्णय एखाद्या मोठ्या बॅकडोर डीलचा भाग आहे का?
किंवा रणनीतिक समझोता?
की एखादे गुप्त राजकीय कॉम्बिनेशन?
कुणालाच ठोस माहिती नाही… पण अफवा वेगाने फिरत आहेत.
उबाठा गटाला मोठा झटका – सर्वात दमदार चेहरा मैदानाबाहेर!
उद्धव ठाकरे गटासाठी हा स्पष्टपणे मोठा धक्का मानला जात आहे.
काकडे हे वाडीतील उबाठाचे ओळखले जाणारे, आक्रमक आणि लोकप्रिय नेते होते.
काही शिवसैनिकांनी तर नाराजी व्यक्त करत उबाठा सोडून शिंदे गटाचा धनुष्य-बाण हातात घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गतीने पसरू लागली आहे.
आता वाडीत थेट ‘भाजप विरुद्ध काँग्रेस’ सामना!
काकडेांनी माघार घेताच वाडीतील संपूर्ण राजकीय हवामान बदलले आहे.

आता लढत थेट भाजप विरुद्ध काँग्रेस अशी दोन धुरंधरांमध्ये सिमटली आहे.
उबाठासह छोटे पक्ष आणि इतर घटकांची ताकद एकदम ढासळल्याचे चित्र आहे.
नागरिकांमध्ये संताप  “हे पचनी पडत नाही!”
स्थानिक नागरिकांनी या निर्णयाला अप्रत्याशित, धक्कादायक आणि सामान्य नसलेला मोठा राजकीय गेम असे संबोधले आहे.
संपूर्ण शहरात एकच चर्चा 
हर्षल काकडे एवढे लढाऊ नेते अचानक का माघारी?
वाडीच्या सियासतवर नवीन वादळ – नवीन समीकरणे, नवीन गठबंधनाची सुरुवात?
काकडे यांची माघार वाडी निवडणुकीतील सर्वात मोठा पॉलिटिकल बॉम्ब ठरत आहे.
या निर्णयाने आगामी निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणे, अनपेक्षित गठबंधन आणि आणखी मोठे ट्विस्ट निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
वाडी नगर परिषद निवडणूक आता अधिकच रोमांचक, तणावपूर्ण आणि थरारक बनली आहे.
एका मुलाखत मध्ये काकडे म्हणाले लढणारच मात्र आता अचानक अर्ज का मागे घेतला? आपले सदस्य वाचावायचे आहे म्हणून तर अर्ज मागे घेतला नाही? मात्र अध्यक्ष पद सोडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वाडीतील राजकारण संपवले असे मत राजकीय विश्लेक्षक यांनी मांडले!

मेक्सीला कट लागल्यावरून चालकाची निर्घृण हत्या! -पत्नीची आरोपींना तात्काळ अटक करण्याची डिजिटल मीडिया पत्रकार परिषद मध्ये केली मागणी

मेक्सीला कट लागल्यावरून चालकाची निर्घृण हत्या!

पत्नीची आरोपींना तात्काळ अटक करण्याची डिजिटल मीडिया पत्रकार परिषद मध्ये केली मागणी

नागपूर | WH NEWS प्रतिनिधी
नारी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका चालकाची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना 25 ऑक्टोबर 2025 रोजी म्हाडा कॉलनी, ब्लॉक क्रमांक 10 येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक राजेश विश्वास वरेकर (48) हे चालक म्हणून काम करत होते. त्यांच्या फोर व्हिलर वाहनाचा कट मेक्सीलगत लागला या किरकोळ कारणावरून आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. 8 ते 10 जणांनी धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
फक्त दोन आरोपी अटकेत, मुख्य आरोपी FIR मध्येच नाही?
पत्नी सोनू राजेश वरेकर यांनी डिजिटल मीडिया भवन येथे गुरुवारी घेटलेल्या पत्रकार परिषद मध्ये गंभीर आरोप केले आहेत.

त्यांच्या म्हणण्यानुसार
• पोलिसांनी फक्त दोन आरोपींना अटक केली असून
• मुख्य आरोपी हनी ठाकूर याचे नाव FIR मध्येच समाविष्ट केलेले नाही
• इतर आरोपी अजूनही फरार आहेत
पत्नीने सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ओळखले गेलेले आरोपी
तक्रारदारांनी दिलेल्यानुसार, हल्ल्यात सहभागी असलेले आरोपी:
• हनी ठाकूर (मुख्य आरोपी – FIR मध्ये नाव नाही)
• कल्पेश रांभा
• लकी वाघमारे
• अंगत डहाट
• चूटका रामटेके
• हर्ष कुथे
• गौरव कुथे
गरीब कुटुंब उघड्यावर
मृतक राजेश वरेकर यांच्या पत्नी व दोन मुलांवर अचानक आलेले हे संकट कोसळले असून कुटुंब आर्थिकदृष्ट्या अतिशय अडचणीत आहे. त्यांनी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

वाडी काँग्रेसमध्ये भूकंप! उमेदवारीवरून महास्फोट — अध्यक्षांसह 200 कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे, भाजपाचा मार्ग मोकळा?

वाडी काँग्रेसमध्ये भूकंप! उमेदवारीवरून महास्फोट — अध्यक्षांसह 200 कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे, भाजपाचा मार्ग मोकळा?
वाडी (WH NEWS प्रतिनिधी) – नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर वाडी काँग्रेसमध्ये अक्षरशः स्फोटक राजकीय उलथापालथ घडली आहे.वाडी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शैलेश थोराणे यांच्यासह जवळपास 200 कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देत पक्षात एकच खळबळ उडवली आहे. अचानक घडलेल्या या नाट्यमय निर्णयामुळे वाडीतील राजकीय वातावरण तापले आहे तर काँग्रेससमोर गंभीर संकट उभे राहिले आहे.
उमेदवारीवरून थोराणेंचा संताप – “आम्हाला वाढवायला सांगा आणि तिकीट बाहेरच्यांना द्या?”

मिळालेल्या माहितीनुसार, शहराध्यक्ष शैलेश थोराणे हे स्वतः उमेदवारीसाठी इच्छूक होते आणि (रविवार ता.16) पर्यंत त्यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांना उमेदवारी देताच थोराणेसह कार्यकर्त्यांचा रोष प्रचंड वाढला.
थोराणे यांनी स्पष्ट शब्दात टीका करत म्हटले कि
“पक्ष वाढवण्याचं काम आम्ही करायचं आणि तिकीट बाहेरच्या लोकांना द्यायचं? हे आम्हाला आता मान्य नाही!”
सुनील केदारांवर तिकीट वाटपात मनमानीचा आरोप!
वाडी व ग्रामीण भागातील पूर्ण तिकीट वाटपाची सूत्रे माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र त्यांनी मनमानी केली, स्थानिक नेतृत्वाला पूर्णपणे डावलले, अशा गंभीर आरोपांचा भडिमार बैठकीत करण्यात आला.
मंगळवारी माजी मंत्री सुनील केदार, रमेशचंद्र बंग, खासदार श्यामकुमार बर्वे, नानाभाऊ गावंडे यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तरी थोराणे गटाने कोणताही प्रतिसाद न दिल्याचे कळते.
तणाव शिगेला –

जिल्हाध्यक्ष,व प्रदेशाध्यक्षांकडे सामूहिक राजीनामे
थोराणे यांच्यासह शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच जिल्हाध्यक्ष अश्वीन बैस यांच्याकडे सुपूर्द केले.
गेल्या काही वर्षांत संघटनात्मक बळ वाढवलेल्या या टीमला अचानकपणे एक ‘झटका’ बसल्याने, कार्यकर्तेही हादरले आहेत.
काँग्रेसला मोठा धक्का – भाजपाचा मार्ग सुकर?
इतक्या मोठ्या प्रमाणावर सामूहिक राजीनाम्यांमुळे वाडी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय विश्लेषकांचे मत –
➡ काँग्रेसचे घरातील घरभेदी वाद भाजपाला थेट फायदा देऊ शकतात.
➡ काँग्रेस की “इतर” — भाजपासमोर कोण उतरेल, याकडे शहरवासीयांचे लक्ष.
पत्रपरिषदेत उपस्थित होते —
शैलेश थोराणे, माजी उपनगराध्यक्ष राजेश थोराणे, जिल्हा महासचिव दुर्योधन ढोणे, प्रकाश कोकाटे, अनिल पाटील, माजी सरपंच भीमराव लोखंडे, प्रमिला पवार, बेबीताई ढबाले यांसह शेकडो कार्यकर्ते.
येथे उघडपणे आरोप झाले की
“स्थानिक निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्यांना प्राधान्य, हे स्वीकारार्ह नाही!”
आता पुढे काय?
थोराणे गट कोणत्या नव्या राजकीय भूमिकेसह पुढे येतो?
काँग्रेस त्यांचे राजीनामे स्वीकारते की त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते?
निवडणुकीत सामना भाजप विरुद्ध काँग्रेस की भाजप विरुद्ध इतर?
वाडीच्या राजकारणात ‘पुढचे पाऊल’ आता सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे.

मिडास हॉस्पिटल, नागपूर येथे करण्यात आले मॅग्निफिकेशन नैरो बँड इमेजिंगवरील लँडमार्क कार्यशाळेचे आयोजन डॉ. केन्शी याओ यांनी भारतात आणली जागतिक तज्ञता

मिडास हॉस्पिटल, नागपूर येथे करण्यात आले मॅग्निफिकेशन नैरो बँड इमेजिंगवरील लँडमार्क कार्यशाळेचे आयोजन
डॉ. केन्शी याओ यांनी भारतात आणली जागतिक तज्ञता

नागपूर, नोव्हेंबर 2025 –मिडास हॉस्पिटल,नागपूरने 13 व 14 नोव्हेंबर 2025 रोजी अत्याधुनिक एंडोस्कोपीवरील एका महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यक्रमाने गॅस्ट्रिक कॅन्सरचे लवकर निदान करण्यासाठी प्रगत एंडोस्कोपिक तंत्रज्ञानाची परिवर्तनशील क्षमता अधोरेखित केली आणि अत्याधुनिक रुग्णसेवेसाठी मिडास हॉस्पिटलच्या वचनबद्धतेची पुन्हा पुष्टी केली.
सामान्य लोकांसाठी,मॅग्निफिकेशन नैरो बँड इमेजिंग (एनबीआय) हे खूप तांत्रिक वाटू शकते. साध्या भाषेत सांगायचे तर, एनबीआय मध्ये विशेष फिल्टर केलेला प्रकाश वापरून पोट आणि आतड्यांतील रक्तवाहिन्या व पृष्ठभागावरील नमुने अधिक स्पष्टपणे दिसतात.जेव्हा हे मॅग्निफिकेशनसह एकत्र केले जाते, तेव्हा डॉक्टरांना न दिसणारे क्षुल्लक ऊतक बदलही दिसू शकतात.थोडक्यात, मॅग्निफिकेशन एनबीआय म्हणजे धूसर फोटो ऐवजी हाय-डेफिनेशन क्लोज-अप—अत्यंत महत्त्वाचे सूक्ष्म तपशील अचानक स्पष्ट होतात.

या कार्यशाळेत जपानमधील फुकुओका विद्यापीठाचे प्राध्यापक आणि जागतिक स्तरावर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी व एंडोस्कोपी क्षेत्रातील अग्रणी मानले जाणारे डॉ.केन्शी याओ उपस्थित होते.डॉ.याओ यांनी आपल्या कारकिर्दीत जीआय ट्रॅक्टमधील कर्करोगाचे लवकर निदान सुधारण्यासाठी अत्याधुनिक तंत्र विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.त्यांच्या कार्यामुळे जागतिक मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल घडले आणि जगभरातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टना कॅन्सर प्रतिबंधासाठी प्रगत इमेजिंग स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली.
गॅस्ट्रिक कॅन्सर हा जगभरातील, विशेषतः आशियातील, सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. दुर्दैवाने, तो अनेकदा हळूहळू वाढतो आणि लक्षणे दिसायला लागतात तेव्हा तो बराच गंभीर टप्प्यात पोहोचलेला असतो. स्क्रीनिंग एंडोस्कोपीमुळे गॅस्ट्रिक कॅन्सरचे लवकर निदान शक्य होते आणि मृत्यूदरात जवळपास 47% घट होते,जे पोटाच्या कर्करोगाविरुद्ध सर्वात परिणामकारक सार्वजनिक आरोग्य हस्तक्षेपांपैकी एक आहे.

एंडोस्कोपीमुळे डॉक्टरांना पोटाची आतील त्वचा थेट पाहता येते, बायोप्सी घेता येतात आणि संशयास्पद विकृती पुढे वाढण्यापूर्वीच काढता येतात.मॅग्निफिकेशन एनबीआय सारख्या तंत्रज्ञानामुळे स्क्रीनिंगची अचूकता लक्षणीय वाढते, ज्यामुळे अत्यंत कमी प्रकरणे निदर्शनास न येता पुढे सरकतात.
कार्यशाळेची ठळक वैशिष्ट्ये:
मॅग्निफिकेशन एनबीआय वरील कार्यशाळेत प्रदेशभरातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सहभागी झाले. डॉ. याओ यांनी गॅस्ट्रिक कॅन्सरचे लवकर निदान करण्याच्या बाबतीत आपला विशाल अनुभव शेअर केला आणि सूक्ष्म म्युकोसल बदल ओळखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. लाईव्ह डेमोमधून मॅग्निफिकेशन एनबीआय कसे सौम्य आणि घातक विकृतींमध्ये अत्यंत अचूकतेने फरक करू शकते हे दाखवण्यात आले.

15 हून अधिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट ने सक्रिय सहभाग घेतला,जिथे लाईव्ह एंडोस्कोपी प्रकरणे सादर करण्यात आली. सहभागी डॉक्टरांनी गॅस्ट्रिक पॅथॉलॉजीसाठी प्रणालीबद्ध स्क्रीनिंगची कला शिकली आणि अत्याधुनिक एंडोस्कोपी तंत्र वापरण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळवला, विशेषत: गॅस्ट्रिक कॅन्सरचे लवकर निदान व व्यवस्थापन यामध्ये त्यांची भूमिका समजावून घेतली.

ही ऐतिहासिक कार्यशाळा मिडास हॉस्पिटलमध्ये डॉ.सौरभ मुकेवार (सीनियर कन्सल्टंट आणि कार्यशाळेचे को- डायरेक्टर),तसेच डेमॉन्स्ट्रेटर डॉ.शुभंकर गोडबोले (कन्सल्टंट–गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी),डॉ.भूषण भावरे (कन्सल्टंट – गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी) यांच्या प्रयत्नांनी आणि मिडास हॉस्पिटलचे डायरेक्टर अँड चीफ ऑफ युनिट डॉ. श्रीकांत मुकेवार यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली.
या सर्वसमावेशक अनुभवाने सततच्या वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले, ज्यामुळे आरोग्यसेवेची गुणवत्ता उंचावते आणि भारतातील रुग्णांनाही जपान व युरोपमध्ये उपलब्ध असलेल्या उच्च दर्जाच्या निदान सोयींचा लाभ मिळतो.
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना,विशेषतः डॉ. याओ यांसारख्या व्यक्तींना आमंत्रित करून मिडास हॉस्पिटल नागपूरमध्ये जागतिक तज्ञता आणण्याची आपली वचनबद्धता दाखवते. रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा तर मिळतोच, पण जगभरातील सर्वोत्तम वैद्यकीय पद्धतींचाही लाभ मिळतो.

विस्तृत दृष्टीकोन: भारतातील गॅस्ट्रिक कॅन्सर प्रतिबंध
भारताला कॅन्सर केअरमध्ये विशेष आव्हाने आहेत, ज्यात उशिरा निदान हा प्रमुख अडथळा आहे. अशा कार्यशाळा स्क्रीनिंग एंडोस्कोपीला नियमित आरोग्य तपासण्यांमध्ये समाविष्ट करण्याची गरज अधोरेखित करतात—विशेषत: उच्च जोखमीच्या गटांसाठी. मॅग्निफिकेशन एनबीआय स्वीकारल्यास रुग्णालयांना आजाराचे लवकर निदान करता येते, उपचारांचा खर्च कमी होतो आणि जीव वाचवता येतात.
मिडास हॉस्पिटलचे हे पाऊल व्यापक दृष्टी दाखवते: अत्याधुनिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी सर्वांसाठी उपलब्ध करणे—फक्त महानगरांपुरती मर्यादित नाही. जागरूकता वाढल्यास, अधिक रुग्णांना उशीरा-टप्प्यातील कॅन्सरचा सामना करण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपायांचा लाभ मिळेल.
मिडास हॉस्पिटल,नागपूरमधील हे कार्यशाळा फक्त एक वैज्ञानिक कार्यक्रम नव्हता—ते रुग्ण-केंद्रित नवकल्पनांचे एक महत्त्वपूर्ण पाऊल होते. डॉ. केन्शी याओ यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनामुळे सहभागी डॉक्टरांनी प्रत्यक्ष पाहिले की मॅग्निफिकेशन एनबीआय कसे गॅस्ट्रिक कॅन्सरचे निदान बदलून टाकू शकते.सामान्य व्यक्तीसाठी संदेश सोपा आहे:लवकर स्क्रीनिंग जीव वाचवते, आणि एनबीआय सारखी तंत्रे लवकर व अचूक निदान अधिक विश्वासार्ह करतात.
जागतिक ज्ञान आणि स्थानिक सेवाभाव यांचा संगम घडवत,मिडास हॉस्पिटल,नागपूर मध्य भारतात आघाडीवर आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञान व आंतरराष्ट्रीय सहकार्य स्वीकारून, ते रुग्णांना घराजवळच जागतिक दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहे.

वाड़ी में सनसनी! सुपारी के बाद अब प्रतिबंधित सुगंधित तंबाकू का बड़ा जखीरा बरामद! -क्राइम ब्रांच की जबरदस्त छापेमारी से हड़कंप! – वाडी पुलीस के कार्यप्रणाली उठ रहें सवाल! -वाडी में क्या चल रहा पीआई को पता नही!

 

वाड़ी में सनसनी! सुपारी के बाद अब प्रतिबंधित सुगंधित तंबाकू का बड़ा जखीरा बरामद!
-क्राइम ब्रांच की जबरदस्त छापेमारी से हड़कंप!
– वाडी पुलीस के कार्यप्रणाली उठ रहें सवाल!
-वाडी में क्या चल रहा पीआई को पता नही!
वाड़ी, नागपूर (WH NEWS विशेष रिपोर्ट)
वाड़ी में मानो अवैध कारोबारियों की किस्मत ही खराब चल रही है! दो दिन पहले 60 लाख की सुपारी से भरा ट्रक पकड़ा गया, और आज फिर,नागपुर क्राइम ब्रांच ने एक और बड़ा धमाका करते हुए प्रतिबंधित सुगंधित तंबाकू का विशाल स्टॉक बरामद कर वाड़ी को हिला कर रख दिया है।लेकिन वाडी कि पुलीस क्या कर रही यह सवाल उठ रहा. सूत्र ने बताया कि वाडी पीआई राजेश तटकरे को सारी जानकारी है फिर भी कारवाई क्यों नही?प्रतिबंधित तंबाखू के इस कार्रवाई में वाहन चोरी विरोधी पथक के एपीआई सुधीर बोरकुटे और उनकी टीम एचसी विलास कोकाटे, पंकज हेडाऊ, राहुल कुसरा, विवेक कावडकर, अभय ढोणे ने आठवा मैल स्थित आरोपी के घर पर धावा बोला।

गुप्त सूचना के आधार पर हुए इस ऑपरेशन में महाराष्ट्र सरकार द्वारा प्रतिबंधित सुगंधित तंबाकू का ₹45,000 का माल जब्त कर लिया गया। मामले में नितेश देविदास डोंगरे (41) और मुख्य आरोपी मोनू उर्फ सुमित विश्वकर्मा को गिरफ्तार किया गया है। दोनों आरोपियों को आगे की कार्यवाही हेतु अन्न व औषधी विभाग नागपुर के हवाले कर दिया गया।लेकिन सबसे बड़ा सवाल स्थानीय वाड़ी पुलिस क्या कर रही थी?

लगातार दो दिनों में दो बड़े अवैध कारोबार सामने आए…
एक 60 लाख की सुपारी तस्करी
-दूसरा प्रतिबंधित तंबाकू का अड्डा
और दोनों का पर्दाफाश क्राइम ब्रांच ने किया!
लोगों में चर्चा तेज है—
“अगर क्राइम ब्रांच इतनी बड़ी कार्रवाई कर सकती है, तो वाड़ी पुलिस को क्या नींद आ रही थी?”

वाड़ी में उठ रहे चुभने वाले सवाल
• वाड़ी पुलिस को अवैध धंधे दिखाई क्यों नहीं देते?
• क्या पुलिस की नाक के नीचे यह सब चलता रहा?
• क्या किसी का संरक्षण है… या सिर्फ लापरवाही?
• चुनाव से ठीक पहले ऐसे खुलासे क्या संकेत दे रहे हैं?

अवैध कारोबारियों में खौफ – वाड़ी में चर्चाओं का तापमान हाई!
क्राइम ब्रांच की लगातार कार्रवाई ने वाड़ी में तहलका मचा दिया है।
स्थानीयों का कहना है—
“अगर इसी तरह कार्रवाई होती रही तो वाड़ी के काले धंधों का बड़ा नेटवर्क खुलकर सामने आएगा!”

अब सबकी नजर वाड़ी पुलिस पर है
क्या वाड़ी पुलिस अपनी आलोचना का जवाब दे पाएगी या आने वाले दिनों में और बड़े खुलासे होंगे?
वाडी में अभी ‘ऑपरेशन क्लीनअप’ की आहट तेज है…
और अवैध कारोबारियों की धड़कनें भी!
वाडी में हो रहें अवैध धंदो पर अब सीपी डीसीपी को हीं ध्यान देना होंगा, नही तो ऐसा हीं कारोबर चलेंगा ऐसा कहना है आम नागरिको का.


 

 

दलित दांपत्याला घराबाहेर हाकलण्याचा कट! -गिट्टीखदान पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह! -कोर्टाच्या आदेशावर घर सील करण्यासाठी आलेले बँकेचे कर्मचारी ज्वाला धोटे यांनी परत केले. -मुख्यमंत्री यांच्या शहरात दलिताचे घर हडपण्याचा डाव!

दलित दांपत्याला घराबाहेर हाकलण्याचा कट! -गिट्टीखदान पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!
-कोर्टाच्या आदेशावर घर सील करण्यासाठी आलेले बँकेचे कर्मचारी ज्वाला धोटे यांनी परत केले.
-मुख्यमंत्री यांच्या शहरात दलिताचे घर हडपण्याचा डाव!

वाडी, नागपूर (WH NEWS )
दलित दांपत्याला त्यांच्या स्वतःच्या घरातून बेदखल करण्याचा गंभीर कट रचला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा केवळ फसवणूक व जाळसाजीचा प्रकार नसून, गिट्टीखदान पोलिसांच्या निष्क्रियते मुळे दलिताचे घर हळपण्याचा डाव साधला. वेळीच पोलीसांनी चौकशी करून आरोपीला अटक केले असते तर धोखाधडी करणारे सामोर आले असते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात दलितांचे घर हडपण्याचा मोठा कट रचल्या गेला असतांना पोलिसांनी मात्र या प्रकरणी गंभीर तेने कार्यवाही न केल्याने दलितावर उघड्यावर राहण्याची वेळे आली.

२००१ पासून राहतात गजभिये परिवार स्वतःच्या घरात
दाभा येथील गणेश नगर परिसरात राहणाऱ्या पूर्णिमा गजभिए या आपल्या कुटुंबासह २००१ पासून प्लॉट क्र. ५८ वर असलेल्या घरात वास्तव्य करीत आहेत. हे घर त्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. आर्थिक अडचणीमुळे पूर्णिमा यांना सुमारे तीन लाख रुपयांच्या कर्जाची गरज होती. त्यावेळी वर्षा भेडे आणि सारंग भेडे या दोघांनी मदतीचे आश्वासन देत त्यांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढले.

कर्जाच्या बहाण्याने घेतले घराचे कागदपत्र!
कर्ज प्रक्रियेच्या नावाखाली आरोपींनी गजभिए यांच्या सर्व कागदपत्रांसह घराची मूळ रजिस्ट्री आपल्या ताब्यात घेतली. दरम्यान, गोपाल नगर येथील राजेंद्र दियेवार यांनाही कर्जाची गरज होती. आरोपींनी चातुर्याने गजभिए यांच्या नावावरील मालमत्ता दियेवार यांच्या नावावर ट्रान्सफर करून घेतली. त्यावर दियेवार यांच्या नावाने 18 लाख लोन घेतले.मात्र, या व्यवहाराची माहिती स्वतः दियेवार यांनाही नव्हती.

१८ लाखांचे कर्ज – पैसे उचलून आरोपी फरार!
बँकेच्या नोंदीप्रमाणे, १८ लाख रुपयांचे कर्ज राजेंद्र दियेवार यांच्या नावाने मंजूर झाले. मात्र, ते पैसे वर्षा भेडे आणि सारंग भेडे यांनी बँकेतून उचलले आणि फरार झाले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच गजभिए यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु,गिट्टीखदान पोलीस स्टेशनचे पीएसआय राठोड यांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला आणि त्यांना वारंवार टाळाटाळ केली.जेव्हा सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी या प्रकरणात लक्ष दिले तेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

गिट्टीखदान पोलिसांची निष्क्रियता उघड!
पूर्णिमा गजभिए यांनी २६ जुलै २०२५ रोजी लेखी तक्रार दिली होती. या प्रकरणात कलम ३१६(२) आणि ३१८ अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला. मात्र, बराच काळ उलटूनही आरोपी फरारच आहेत. पोलिसांची निष्क्रियता पाहून नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.

घर सील करण्यास बँक कर्मचारी पोहोचले,ज्वाला धोटे यांच्या मध्यस्थीतिने परत गेले. काही काळ वाढला होता तणाव
११ नोव्हेंबर रोजी होम फर्स्ट फायनान्स कंपनीचे अधिकारी, वकील आणि पोलिस दल घर सील करण्यासाठी आले. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे घटनास्थळी पोहोचल्या आणि पोलिस व बँक अधिकाऱ्यांशी संवाद साधून कारवाई थांबवली. त्यांच्या प्रयत्नानंतर बँकेने अखेर ३० दिवसांचा अंतिम नोटीस देण्याचा निर्णय घेतला.

तणावामुळे मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न
या प्रकारामुळे पूर्णिमा गजभिए यांचा मुलगा रंजीत गजभिए याने पूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ११ नोव्हेंबर रोजी पुन्हा घर सील होणार असल्याने त्याची प्रकृती बिघडली, त्यामुळे पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

न्यायासाठी गजभिए यांची मागणी
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे की वर्षा भेडे, सारंग भेडे आणि या फसवणुकीत सहभागी सर्वांना त्वरित अटक करण्यात यावी. तसेच गिट्टीखदान पोलिसांच्या निष्क्रियतेची चौकशी करून कारवाई व्हावी.

ज्वाला धोटे म्हणाल्या —
“हा केवळ एका दलित कुटुंबाचा प्रश्न नाही, तर न्यायव्यवस्था आणि दलित समाजाच्या हक्कांचा प्रश्न आहे. अशा प्रकरणांत पोलिसांनी कार्यवाहीचे पाऊल उचलले नाही हे सर्वात मोठे अपराध आहे,” असे मत सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी व्यक्त केले.

पीडित राजेंद्र दियेवार म्हणाले —
“या घराशी माझा काहीही संबंध नाही. माझ्या नावाने रजिस्ट्री कशी केली, लोन कसे झाले याची मला माहितीही नाही. मी स्वतः वर्षा भेडे यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात जाणार आहे,” पोलिसांनी माझी तक्रार नोंदवावी व दोषीवर कार्यवाही करावी, माझे नावाने घेतलेले 18 लाख लोन त्यांच्या कडून वसूल करावे असे त्यांनी सांगितले.

वाडी में तडीपार बदमाश पुलिस की नाक तले खुलेआम घूम रहे अपराधी, चुनाव के दौर में बढ़ सकती है अशांति!

वाडी में तडीपार बदमाश पुलिस की नाक तले खुलेआम घूम रहे अपराधी, चुनाव के दौर में बढ़ सकती है अशांति!

वाडी (WH NEWS प्रतिनिधि) – वाडी पुलिस थाने की कार्यप्रणाली पर एक बार फिर सवाल उठ रहे हैं। जानकारी के अनुसार, वाडी पुलिस ने अब तक लगभग 36 बदमाशों को तडीपार किया था। इनमें से 7 लोगो ने कोर्ट से राहत पाकर अपनी तडीपारी निरस्त करवा ली है, लेकिन कई ऐसे तडीपार अपराधी आज भी शहर में खुलेआम घूमते नज़र आ रहे हैं।

स्थानीय नागरिकों का कहना है कि यह सब वाडी पुलिस की मेहरबानी के बिना संभव नहीं है। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार, कुछ तडीपार लोग न केवल शहर में सक्रिय हैं, बल्कि अवैध धंधों में भी लिप्त हैं  जिनमें ऑनलाईन सट्टा, शराब, ड्रग्स और गांजा जैसे अपराध शामिल बताए जाते हैं।

और तो और, कुछ तडीपार अपराधी तो मीडिया के सामने आकर बयान देते और पब्लिक प्लेटफॉर्म पर दिखते हैं, जिससे यह साफ झलकता है कि पुलिस और प्रशासन की पकड़ उन पर बिल्कुल ढीली हो चुकी है।पीएसआई डिबी इन्चार्ज अमित बंडगर को इस संदर्भ में पूछने पर बताया कि 142कि कारवाई बहोत तडीपार पर कि है.क्षेत्र में तडीपार दिखाई दिए तो उनपर कारवाई करते है. हमारी कडी नजर उनपर रहती है.

वाडी नगर परिषद चुनाव नज़दीक हैं और ऐसे में इन तडीपार बदमाशों की सक्रियता से शहर का माहौल बिगड़ने की पूरी संभावना है। चुनावी माहौल में ऐसे अपराधियों की मौजूदगी शांति व्यवस्था के लिए गंभीर खतरा बन सकती है।
नागरिकों का कहना है कि वाडी पुलिस के साथ-साथ वरिष्ठ अधिकारी डीसीपी स्तर पर भी इस पूरे मामले की जानकारी रखे हुए हैं, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है। इससे यह सवाल उठता है कि आखिर पुलिस प्रशासन किनके इशारों पर आंख मूंदे बैठा है?
अब देखना यह होगा कि आने वाले दिनों में पुलिस इन तडीपार अपराधियों पर कार्रवाई करती है या नहीं, क्योंकि अगर इसी तरह हालात बने रहे तो वाडी में कानून व्यवस्था पर बड़ा संकट खड़ा हो सकता है।