आरटीई प्रवेशासाठी अंतराची अट अन्यायकारक; सरकारला नियम बदलण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश – आंबेडकरी युवकांनी दाखल केली होती हायकोर्टात याचिका

Follow Us on :

आरटीई प्रवेशासाठी अंतराची अट अन्यायकारक; सरकारला नियम बदलण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
– आंबेडकरी युवकांनी दाखल केली होती हायकोर्टात याचिका

नागपूर WH NEWS : शिक्षणाचा मूलभूत अधिकार लक्षात घेता, आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी मुलांच्या घरापासून शाळेचे कठोर अंतर निश्चित करणे योग्य नसल्याचे निरीक्षण बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे. राज्य सरकारने या संदर्भातील नियमांमध्ये तातडीने सुधारणा कराव्यात, असे निर्देश देत दोन दिवसांत त्याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.16 मार्च पर्यंत अनुपालन रिपोर्ट प्रस्तुत करण्याचे सांगितले.

न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठासमोर ही बाब सुनावणीस आली. सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत आरटीई प्रवेश प्रक्रियेत लावण्यात आलेल्या एक किलोमीटरच्या अंतराच्या अटीवर आक्षेप घेण्यात आला होता.

न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, अनेक भागांमध्ये विद्यार्थ्यांच्या घराजवळ एक किलोमीटरच्या परिसरात शाळाच उपलब्ध नसते. अशा परिस्थितीत कठोर अंतराची अट लावल्यास मुलांच्या शिक्षणाच्या हक्कावर मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत लवचिकता आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

निःशुल्क व सक्तीचे शिक्षण अधिनियम 2009 नुसार 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार देण्यात आला आहे. या कायद्यानुसार खासगी, विनाअनुदानित शाळांना पहिल्या इयत्तेत किमान 25 टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे.
दरम्यान, आरटीई प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीखही 18 मार्चपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.सदर याचिका आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते आशिष फुलझले, वैभव कांबळे, अनिकेत कुतरमारे यांनी दाखल केली होती. या तीनही युवकांचे समाजात कौतुक केले जात आहे.

News By

  • विजय सीताराम खवसे महाराष्ट्र के नागपुर में सक्रिय एक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता और डिजिटल मीडिया न्यूज़ पोर्टल संघ नागपुर के सचिव है। वे जनहित से जुड़े मुद्दों पर निर्भिड और निष्पक्ष पत्रकारिता के लिए जाने जाते हैं। कई बार लोगों की मदद के लिए अपने संसाधनों का भी उपयोग करते हैं। नागपुर पुलिस आयुक्त के साथ हुए एक विवाद के बाद उनका नाम व्यापक रूप से चर्चा में आया।

    प्रारंभिक जीवन और शिक्षा
    विजय सीताराम खवसे का जन्म महाराष्ट्र के अमरावती जिले के थुगाव इसापूर, तहसील चांदुर रेल्वे में हुआ।अब नागपूर निवासी बने.उनकी प्रारंभिक शिक्षा स्थानीय क्षेत्र में हुई। आगे की पढ़ाई उन्होंने अशोक महाविद्यालय, चांदुर रेल्वे से की, जहाँ से उन्होंने बी.ए. पार्ट 2 तक पढाई कि । इसके बाद नागपुर में स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विश्वविद्यालय से उन्होंने पत्रकारिता (Journalism) का अध्ययन किया।

    पत्रकारिता करियर
    विजय खवसे ने वर्ष 2016 से 2022 तक दैनिक भास्कर, वाडी (नागपुर) में संवाददाता के रूप में कार्य किया। इस दौरान उन्होंने शहर में चल रहे विभिन्न सामाजिक और जनहित के मुद्दों पर रिपोर्टिंग की।
    इसके अतिरिक्त उन्होंने कई समाचार पत्रों में मुक्त पत्रकार (फ्रीलांस पत्रकार) के रूप में भी काम किया।

    WH NEWS की स्थापना
    वर्ष 2018 में उन्होंने “WH NEWS” नामक वेब पोर्टल और डिजिटल न्यूज प्लेटफॉर्म की स्थापना की। इस प्लेटफॉर्म के माध्यम से वे नागपुर और आसपास के क्षेत्रों के सामाजिक, प्रशासनिक और जनहित से जुड़े मुद्दों को प्रमुखता से उठाते हैं। वर्तमान में वे WH NEWS के मुख्य संपादक के रूप में कार्यरत हैं।

    विचारधारा और सामाजिक कार्य
    विजय खवसे को आंबेडकरवादी विचारधारा से प्रेरित माना जाता है और वे बहुजन आंदोलन तथा सामाजिक न्याय से जुड़े मुद्दों पर सक्रिय रहते हैं। उनकी पत्रकारिता का मुख्य उद्देश्य समाज में अन्याय, भ्रष्टाचार और अवैध गतिविधियों को उजागर करना तथा आम जनता की आवाज़ को मंच देना है।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए