विद्युत तारेच्या घर्षणाने २ एकरातील गहू जळून खाक कर्जकाढून केलेली गव्हाच्या पेरणीचे तब्बल दीड लाखांचे नुकसान

Follow Us on :

विद्युत तारेच्या घर्षणाने २ एकरातील गहू जळून खाक
कर्जकाढून केलेली गव्हाच्या पेरणीचे तब्बल दीड लाखांचे नुकसान
शिरजगाव मोझरी : कृषी पंपासाठी उभारण्यात आलेल्या विद्युत विभागाच्या नादुरुस्त लोंबत्या तारांमधून स्पार्किंग होऊन शिरजगाव मोझरी येथील अरविंद डफळ यांच्या शेतातील दोन एकरातील गहू जळून खाक झाला. शनिवारी दुपारी १२.४५ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली दरम्यान शेजारच्या शेतकऱ्यांना आगीची माहिती मिळताच स्पिंकलरच्या सहाय्याने आणि शेतकऱ्यांनी हाताने गव्हाच्या पिकात लागलेली आग तब्बल अर्ध्या तासानंतर रोखण्यात त्यांना यश आले. मात्र तोपर्यंत २ एकरातील गहू जळून खाक झाला.

अरविंद गोपाळराव डफळ यांचे मौजा कोळवण येथे रब्बीच्या पिकांमध्ये गव्हाची लागवड केली होती. लागवडीसाठी कर्ज आणि ऊसनवारी घेऊन गव्हाची लागवड केली होती. येत्या ५ दिवसात गहू कापणीला आला होता. मात्र त्यापूर्वीच विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे लोंबलेल्या तारांमधून स्पार्किंग होऊन आगीचे गोळे गव्हाच्या उभ्या पिकावर पडून पिक जळून खाक झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहे.

शेतकऱ्यांकडून लोंबलेल्या तारांच्या विरोधात शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या आहे. मात्र, विद्युत विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने इथून पुढेही अशा आगीच्या घटना होण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर विद्युत विभागाचे अभियंता मिश्रा यांनी घटनास्थळी येऊन मोक्का पंचनामा केला आहे. तर घटनेची तहसीलदार मयूर कळसे आणि तलाठी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी तक्रार केली आहे. ज्यामध्ये विद्युत विभागाकडून कृषी पंपाच्या खांबावरील तारा दुरुस्ती करणे, ट्री कटिंग करणे आणि पीडित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
————
कर्ज आणि ऊसनवारी घेऊन गव्हाची पेरणी केली होती. मात्र पिक हाती येण्यापूर्वीच पिक विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे जळले. तब्बल दीड लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने हे नुकसान भरपाई देण्यात यावी.
– अविनाश डफळ, पीडित शेतकरी
– —————-

News By

  • विजय सीताराम खवसे महाराष्ट्र के नागपुर में सक्रिय एक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता और डिजिटल मीडिया न्यूज़ पोर्टल संघ नागपुर के सचिव है। वे जनहित से जुड़े मुद्दों पर निर्भिड और निष्पक्ष पत्रकारिता के लिए जाने जाते हैं। कई बार लोगों की मदद के लिए अपने संसाधनों का भी उपयोग करते हैं। नागपुर पुलिस आयुक्त के साथ हुए एक विवाद के बाद उनका नाम व्यापक रूप से चर्चा में आया।

    प्रारंभिक जीवन और शिक्षा
    विजय सीताराम खवसे का जन्म महाराष्ट्र के अमरावती जिले के थुगाव इसापूर, तहसील चांदुर रेल्वे में हुआ।अब नागपूर निवासी बने.उनकी प्रारंभिक शिक्षा स्थानीय क्षेत्र में हुई। आगे की पढ़ाई उन्होंने अशोक महाविद्यालय, चांदुर रेल्वे से की, जहाँ से उन्होंने बी.ए. पार्ट 2 तक पढाई कि । इसके बाद नागपुर में स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विश्वविद्यालय से उन्होंने पत्रकारिता (Journalism) का अध्ययन किया।

    पत्रकारिता करियर
    विजय खवसे ने वर्ष 2016 से 2022 तक दैनिक भास्कर, वाडी (नागपुर) में संवाददाता के रूप में कार्य किया। इस दौरान उन्होंने शहर में चल रहे विभिन्न सामाजिक और जनहित के मुद्दों पर रिपोर्टिंग की।
    इसके अतिरिक्त उन्होंने कई समाचार पत्रों में मुक्त पत्रकार (फ्रीलांस पत्रकार) के रूप में भी काम किया।

    WH NEWS की स्थापना
    वर्ष 2018 में उन्होंने “WH NEWS” नामक वेब पोर्टल और डिजिटल न्यूज प्लेटफॉर्म की स्थापना की। इस प्लेटफॉर्म के माध्यम से वे नागपुर और आसपास के क्षेत्रों के सामाजिक, प्रशासनिक और जनहित से जुड़े मुद्दों को प्रमुखता से उठाते हैं। वर्तमान में वे WH NEWS के मुख्य संपादक के रूप में कार्यरत हैं।

    विचारधारा और सामाजिक कार्य
    विजय खवसे को आंबेडकरवादी विचारधारा से प्रेरित माना जाता है और वे बहुजन आंदोलन तथा सामाजिक न्याय से जुड़े मुद्दों पर सक्रिय रहते हैं। उनकी पत्रकारिता का मुख्य उद्देश्य समाज में अन्याय, भ्रष्टाचार और अवैध गतिविधियों को उजागर करना तथा आम जनता की आवाज़ को मंच देना है।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए