भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या महत्त्वपूर्ण टप्प्यासोबत गुगलने इंडिया एआय हबची पायाभरणी केली, राष्ट्रीय औद्योगिक परिसंस्थेची सुरुवात
नागपूर WH NEWS – गुगल ने भारतातील एआय हबसाठी पायाभरणी करत देशाच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या महत्त्वपूर्ण टप्प्याला नवी दिशा दिली आहे. अदाणी कॉनेक्स आणि नेक्स्ट्रा बाय एयरटेल यांच्या धोरणात्मक भागीदारीत विकसित करण्यात येणारा हा प्रकल्प ‘विकसित भारत’ साकारण्यासाठी गिगावॅट-स्तरीय एआय परिसंस्था उभारणार आहे.
विशाखापट्टणम—गुगलने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आपल्या महत्त्वाकांक्षी एआय हबची अधिकृत पायाभरणी केली. हा प्रकल्प भारताच्या डिजिटल भविष्यातील कंपनीची आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार असून, भारताच्या आर्थिक आणि पर्यावरणीय लवचिकतेसाठी दीर्घकालीन भागीदार आणि उत्प्रेरक म्हणून गुगलची बांधिलकी अधिक मजबूत करतो.अदाणी कॉनेक्स आणि नेक्स्ट्रा बाय एयरटेल यांच्या सहकार्याने साजरा करण्यात आलेला हा भूमिपूजन समारंभ आंध्र प्रदेशातील तर्लुवाडा येथे पार पडला.यावेळी अश्विनी वैष्णव,एन. चंद्राबाबू नायडू, नारा लोकेश, बिकाश कोले, करण अदाणी, जीत अदाणी आणि राकेश मित्तल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गोपाल विट्टल,एक्झिक्युटिव्ह व्हाइस चेअरमन,भारती एअरटेल म्हणाले: “गुगल आणि अदाणी यांच्यासोबत या महत्त्वपूर्ण एआय हबच्या उभारणीसाठी असलेल्या आमच्या धोरणात्मक भागीदारीद्वारे आम्ही भारताच्या डिजिटल महत्त्वाकांक्षा पुढे नेण्यास मदत करू. विशाखापट्टणम जागतिक एआय नकाशावर एक नवीन केंद्र म्हणून उदयास येत असताना, आम्ही भारताला नवोपक्रम आणि शाश्वत वाढीमध्ये आघाडीवर ठेवू — केवळ आपल्या देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी. आमचे अत्याधुनिक डेटा सेंटर्स, हरित उर्जेचा वापर, देशभरातील अल्ट्रा-लो लेटन्सी फायबर आणि पुढील पिढीचे केबल लँडिंग स्टेशन यांच्या मदतीने विझागमध्ये मोठ्या प्रमाणावर जागतिक दर्जाची एआय पायाभूत सुविधा सक्षम होईल.”
