Category: विदर्भ

  • नामांतर चळवळी तील योद्धा उपेंद्र शेंडे  निष्ठावंत सूर्यअखेर काळाच्या पडद्याआड… आज 4वाजता होणार अंतिम संस्कार 

    नामांतर चळवळी तील योद्धा उपेंद्र शेंडे  निष्ठावंत सूर्यअखेर काळाच्या पडद्याआड… आज 4वाजता होणार अंतिम संस्कार 

    नामांतर चळवळी तील योद्धा उपेंद्र शेंडे 
    निष्ठावंत सूर्यअखेर काळाच्या पडद्याआड… आज 4वाजता होणार अंतिम संस्कार 

    नागपूर – पंचशील नगर बुद्ध विहार चे पुर्व सरचिटणीस दौलतराव बारसे अमर चैत्य बारसे घाट सिद्धार्थ नगर चे माजी सरचिटणीस रिपब्लिकन पक्षाचे नेते नामांतर वीर तसेच माजी आमदार उपेंद्र जी शेंडे साहेब यांचे आज पहाटे ,३.३० वाजता नागपूर येथील रुग्णालयात निधन झाले.त्यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळी ला मोठा धक्का बसला.

    महामानवडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून रिपब्लिकन पक्षाची चळवळ रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि श्वासापर्यंत निष्ठेने प्रामाणिक राहून समाज उत्थानासाठी काम करणारा निस्वार्थी त्यागी चळवळीतला झंजावात आज आपल्यातून निघून गेले. निष्ठावंत सूर्याने समाजाला प्रकाश देण्याचे कार्य थांबवून जगाचा निरोप घेतला.

    निस्वार्थ, त्यागी नामांतर वीर माजी आमदार उपेंद्र शिंदे साहेब यांच्या दुःखद निधनाने रिपब्लिकन पक्षाची आणि आंबेडकर चवळीची मोठी हानी झालेली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
    रिपब्लिकन पक्ष ( खोरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष तथा नामांतरवीर मा आ उपेंद्रजी शेंडे साहेब यांचे मेडिकल कॉलेज, नागपूर येथे शनिवार दि २८-१२-२०२४ रोजी पहाटे ३-३० वा दु:खद निधन झाले आहे त्यांची अंत्ययात्रा शनिवार दि २८-१२-२०२४ रोजी सायंकाळी ४-०० वा त्यांच्या राहत्या घरापासून महेंद्र नगर,पाण्याच्या टाकी जवळ, नागयेथून निघणार असून वैशाली घाट येथे अंतिम संस्कार होईल.

    बुधवासी उपेंद्र शेंडे साहेब यांना WH न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹

  • जहाल नक्षलवादी देवाचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण  ◼️सात लाख रुपयांचे होते बक्षीस

    जहाल नक्षलवादी देवाचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण ◼️सात लाख रुपयांचे होते बक्षीस

    जहाल नक्षलवादी देवाचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण

    ◼️सात लाख रुपयांचे होते बक्षीस

    गोंदिया : 7 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याने गुरुवार (ता. 26) नक्षल चळवळीचा त्याग करून गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांचेसमक्ष आत्मसमर्पण केले. देवा उर्फ अर्जुन उर्फ राकेश सुमडो मुडाम (वय 27 वर्ष, रा. गुंडम सुटबाईपारा, पोस्ट- बासागुडा, ता. ऊसुर, पोलीस ठाणे पामेड, जि. बिजापुर (छ.ग.) (सदस्य तांडा दलम, मलाजखंड दलम, पामेड प्लाटून- 9/ प्लाटून पार्टी कमिटी मेंबर) असे आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्याचे नाव आहे.

    देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करुन त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, त्यांचे सामाजिक व आर्थीक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत नक्षल आत्मसमर्पण योजना राबविली जात आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक, नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली माओवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याकरीता गोंदिया जिल्ह्यात प्रभावी नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने विविध उपक्रम राबवून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेला/नागरीकांना देऊन जनजागृती करण्यात येत आहे. तसेच जे माओवादी विविध भूलथापा व प्रलोभनांना बळी पडून माओवादी संघटनेत भरती झाले, त्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला प्रभावित होत आणि माओवादी संघटनेत होणारा त्रास व अत्याचारास कंटाळून 7 लाखाचे बक्षिस असलेल्या जहाल माओवादी प्लाटून पार्टी कमिटी मेंबर देवा उर्फ अर्जुन उर्फ राकेश सुमडो मुडाम याने गुरुवार 26 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्यासमक्ष आत्मसमर्पण केले.

    माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कार्यवाही नक्षल विरोधी अभियान नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप- महानिरीक्षक अंकीत गोयल, गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

    ◼️बालवयापासूनच नक्षल चळवळीत सहभाग..

    आत्मसमर्पित माओवादी देवा याचे मुळ गाव बिजापुर जिल्ह्यातील अति नक्षल प्रभावित भागात असल्याने त्याचे गावात पुर्वी पासुनच सशस्त्र गणवेषधारी माओवाद्यांचे येणे जाणे होते. माओवाद्यांच्या भुलथापा व प्रलोभनांना बळी पडुन त्यांच्या निर्देशाप्रमाणे लहानपणापासुनच तो नक्षल चळवळीत सहभागी होवुन बाल संघटनमध्ये काम करीत होता. त्यानंतर सन- 2014 मध्ये तो पामेड दलम (दक्षीण बस्तर), जि. बिजापुर मध्ये भरती झाला व शस्त्र हातात घेतले. पामेड दलम मध्ये 6 महिने काम केल्यानंतर सन- 2014 चे अखेरीस त्याने अबुझमाड एरीया मध्ये अडीच महिन्याचे प्रशिक्षण घेतले, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यास सन 2015 मध्ये माओवाद्यांचे बस्तर एरीया मधुन एम. एस. सी. (महाराष्ट्र- मध्यप्रदेश -छत्तीसगड) झोन कडे पाठविण्यात आले. एम.एम.सी. मध्ये येवून सुरुवातीला त्याने दलम सदस्य म्हणून सन 2015 ते 2016 पर्यंत तांडा दलम व सन 2016 ते 2017 पर्यंत मलाजखंड दलम मध्ये काम केले. त्यादरम्यान मलाजखंड एरीयाचा डि.व्ही.सी.एम. चंदु ऊर्फ देवचंद याचा अंगरक्षक म्हणून काम केले. सन- 2018 मध्ये त्यास परत दक्षीण बस्तर एरीया मध्ये पाठविण्यात आले. सन 2018 ते सप्टेंबर 2019 पर्यंत (माओवादी संघटना सोडण्यापर्यंत) त्याने पामेड प्लाटून क्रं. 9 मध्ये प्लाटून दलम सदस्य म्हणून काम केले.

    ◼️या कारवायांमध्ये होता सहभागी…

    आत्मसमर्पीत माओवादी देवा हा सन 2014 ते 2019 नक्षल संघटनेत कार्यरत असताना टिपागड फायरींग (जिल्हा गडचिरोली), झिलमिली काशीबहरा बकरकट्टा फायरींग (जि. राजनांदगाव, छ.ग.), झिलमिली / मलैदा फॉरेस्ट कर्मचारी यांना मारहाण व चौकी जाळपोळ (जि. राजनांदगाव, छ.ग.), हत्तीगुडा / घोडापाठ फायरींग (जि. राजनांदगाव, छ.ग.), किस्टाराम ब्लास्ट (जि. सुकमा, छ.ग.), पामेड फायरींग (जि. बिजापुर, छ.ग.) इ. गुन्हयात सहभागी असल्याची माहिती दिली आहे.

    ◼️हिंसेचा मार्ग त्यागून समाजाच्या मुख्य प्रवाहात या

    “विकास कामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर गोंदिया पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास समर्थ असून जे माओवादी हिंसेचा मार्ग त्यागून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ठ होण्यास ईच्छुक असतील त्यांना आत्मसमर्पण करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांचे जिवन सुकर करण्यास व त्यांना सन्मानाने जिवन जगण्यास गोंदिया पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल” असे आवाहन गोंदिया पोलीस प्रशासनाकडूनकरण्यात आले आहे.

  • सुशासन सप्ताह निमित्त तंबाखूमुक्त अभियान

    सुशासन सप्ताह निमित्त तंबाखूमुक्त अभियान

    सुशासन सप्ताह निमित्त तंबाखूमुक्त अभियान

    गोंदिया : राष्ट्रीय तंबाखू मुक्त आरोग्य अभियान आणि जिल्हा सुशासन प्रशासन सप्ताह
    अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात दिनांक 23 डिसेंबर पासून तंबाखू मुक्त युवकांसाठी मौखिक आरोग्य तपासणी व उपचार शिबीर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केले आहे. या कॅम्पला मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर, मनो चिकित्सा अधिकारी डॉ. सुरेखा आझाद मेश्राम, दंत चिकित्सक डॉ. नाकाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर म्हणाल्या भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी बाजपाई यांच्या स्मृतीमध्ये दर वर्षी प्रमाणे 23 डिसेंबर पासून
    सुशासन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

    या सप्ताह निमित्ताने आरोग्य विभागातर्फे नाविन्यपूर्ण कॅम्प मध्ये टोबॅको फ्री सोसायटी निर्माण करण्यासाठी केटीएस येथील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सेलचे अधिकारी, कर्मचारी गोंदिया जिल्हाभर विविध कॅम्पेन राबवून जनजागृती करीत आहेत. या वेळी मनोचिकित्सक डॉ सुरेखा आझाद मेश्राम यांनी अडीकॅशन फ्री युथ संकल्पना विस्ताराने समजावुन सांगितली व गुटखा खाल्ल्यामुळे 85% युवकांचे तोंड उघडत नाही हे वास्तव असल्याचे सांगितले. या नाविन्यपूर्ण कॅम्प साठी जिल्हा मौखिक आरोग्य सेलच्या पथकाने सहकार्य केले.

  • नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणाचा फटका..!  -डॉक्टरांकडून चुकीच्या पद्धतीने टाके लावण्यात आल्यामुळे इन्फेक्शन होऊन महिलेची प्रकृती चिंताजनक!

    नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणाचा फटका..! -डॉक्टरांकडून चुकीच्या पद्धतीने टाके लावण्यात आल्यामुळे इन्फेक्शन होऊन महिलेची प्रकृती चिंताजनक!

    नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणाचा फटका..!

    -डॉक्टरांकडून चुकीच्या पद्धतीने टाके लावण्यात आल्यामुळे इन्फेक्शन होऊन महिलेची प्रकृती चिंताजनक!

    गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यात शासकीय आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले असून रुग्णांना आपला जीव गमावण्याची वेळ यंत्रणेतील हलगर्जीपणामुळे येऊ लागली आहे. अशात नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणाचा फटका स्तनदा मातेला बसला असून प्रसूती दरम्यान केलेल्या उपचारात डॉक्टरांकडून चुकीच्या पद्धतीने टाके लावण्यात आल्यामुळे इन्फेक्शन होऊन महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार नवेगावबांध येथील रागिनी मसराम ही गरोदर माता पहिल्या प्रसूतीसाठी 6 डिसेंबर रोजी नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात आंतर रुग्ण सेवेसाठी दाखल झाली. दरम्यान, रात्री 8 वाजताच्या सुमारास तिने गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, प्रसूतीदरम्यान तिला टाके लावण्याची वेळ आली असता डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे चुकीच्या पध्दतीने टाके लावण्यात आल्याने सदर स्तनदा मातेची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे त्या महिलेवर उपचार होऊ शकत नाही, अशी असमर्थता दाखवून नागपूरला हलविण्यात आले.

    गेल्या 20 दिवसापासून स्तनदा माता नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असून नागपूर येथील डॉक्टरांनी शरीरात इन्फेक्शन झाल्याने किडनी व मेंदूवर आघात झाल्याचे सांगितले. त्यामुळे त्या महिलेची प्रकृती चिंताजनक झाली असून डॉक्टरांचा निष्काळजीपणा स्तनदा मातेच्या जिवावर बेतला आहे. तर दुसरीकडे तिने जन्म दिलेल्या गोंडस बाळाचा सांभाळ गेल्या वीस दिवसापासून वृद्ध आजी करीत आहे. या प्रकारामुळे मसराम कुटुंब चांगल्याच अडचणीत आला आहे.

  • स्नेहमिलन सोहळ्यातून २४ वर्षानंतर झाली वर्गमित्रांची भेट  ◼️जोश उत्साहासह मैत्रीबंध मेळावा ठरला भावनिक

    स्नेहमिलन सोहळ्यातून २४ वर्षानंतर झाली वर्गमित्रांची भेट ◼️जोश उत्साहासह मैत्रीबंध मेळावा ठरला भावनिक

    स्नेहमिलन सोहळ्यातून २४ वर्षानंतर झाली वर्गमित्रांची भेट

    ◼️जोश उत्साहासह मैत्रीबंध मेळावा ठरला भावनिक

    गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील डॉक्टर राधाकृष्णन विद्यालयातील २००१ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा जवळील इटियाडोह धरण गोठणगाव येथे ता.२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला तब्बल २४ वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्ग मित्रांनी दिसताच एकमेकांशी गळाभेट घेत आस्थेने विचारपूस केली स्वतःसह आपल्या बायको मुलांचा परिचय करून देत संवाद साधला, एकमेकांशी मनसोक्त गप्पागोष्टी करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

    गेल्या दीड वर्षापासून सातत्याने आपल्या वर्ग मित्रांची भेट व्हावी जुने दिवस जुने बालपण पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर दिसावं यासाठी १४ डिसेंबर २०२३ रोजी व्हाट्सअप ग्रुप तयार करून संजय वलथरे गणेश धामट गौतम शहारे गंगोत्री जांभूळकर या वर्ग मित्रांनी विखुरलेल्या मित्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला पाच दहा जवळील मित्र जोडले हळूहळू मित्रांची संख्या वाढत गेली आणि आज तारखेत तब्बल ६३ वर्गमित्र व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले. बेत ठरला भेटायचं दीड वर्षापासून सुरू असलेल्या नियोजनाला तारीख मिळाली २५ डिसेंबर स्थळ ठरल ईटियाडोह धरण गोठणगाव येथे एकत्र जमण्याचा संकल्प केला, दिवस उजाडला ठरल्या प्रमाणे हळूहळू सकाळपासूनच एकेक जण जमायला सुरुवात झाली आणि तोच एक एक मित्र एकमेकांना दिसू लागला चेहरा समोर येतात जुन्या आठवणी समोर यायला लागल्या हळूहळू २५ ते ३० वर्गमित्र जमले आणि नेहमीप्रमाणे वर्ग सुरू होण्याआधी गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा या गुरु पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी इतिहासाचे शिक्षक वलथरे सर तर इंग्रजीचे शिक्षक निमकर सर यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली मान्यवर गुरुजनांचा येथोचित मानसन्मान केला त्यांनीही या बॅचमधील असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची आपल्या वाणीतून आठवण करून दिली.व पुढील वाटचाली करिता सुभेच्छा दिल्या.

    उपस्थित झालेल्या सर्व वर्गमित्रांनी आपाल्या भावना व्यक्त केल्या वर्गात घडलेला प्रसंग अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आपल्या जीवनात यशस्वी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपला जुजबी परिचय गुरुजनांना व सहकारी मित्र मैत्रिणींना करुन दिला. हा मैत्रीबंध संमेलन जितका उत्साही व जोश पूर्ण होता तेवढाच भावनिक ठरला पुढील वर्षी परत नव्या दमान भेटण्याचा संकल्प करीत एकमेकांचा निरोप घेतला हा स्नेहमिलन यशस्वी करण्यासाठी सर्व वर्गमित्रांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता अल्पोहारांनी करण्यात आली.

    “ २४ वर्षाआधी कुणाच्या पायात चप्पल तर कुणी अनवाणी, हाफ पॅन्ट आणि शॉर्टसर्ट घालून कुणी पायी तर कुणी सायकलने सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकत्र वेळ घालवणारे सर्व वर्गमित्र आज मोठ्या सुटा बुटात थाटामाटतात फरक एकच त्यावेळी ओठावर मिशी नव्हती गाल साफ होते पण आता मात्र दाढी वाढलेली टक्कल पडलेलं अचानक इतक्या वर्षानंतर थेट भेट झाल्याने अनेकांना आपल्या वर्गातील गोड – गोड आठवणी यायला लागल्या सगळ्यांना गप्पागोष्टी शिक्षकांच्या उखाड्या पाखाड्या आठवल्या अशातच बहुतेक वर्गमित्र मिळाले पणं काही काम असल्यामुळे येऊ शकले नाही. मात्र, काही या जगातच राहीले नसल्याने येऊ शकले नाही अशा वर्गमित्र व शिक्षकांच्या आठवणीने काही क्षणाकरिता सगळ्यांच्या डोळ्यात दुःख दिसून आले त्या सर्वांना दोन मिनिटांचं मौन पाळून आपल्या मित्र व शिक्षकांना श्रद्धांजली वाहली.”

    सर्वांनी एकमेकांची भेट घेत
    नौकरी व्यवसाय कौटुंबिक सुख-दुःख प्रसंग कथन केले. संपूर्ण दिवस उत्साही वातावरणात गेलेल्या या वर्ग मित्रांनी पुन्हा पुढल्या रौप्यमहोत्सवी २५ व्या वर्षी यापेक्षाही अधिक जल्लोषात स्नेहमिलन करण्याचा संकल्प करून सर्वांचा निरोप घेतला.

  • माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला: देवेंद्र फडणवीस

    माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला: देवेंद्र फडणवीस

     

    माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला: देवेंद्र फडणवीस

    मुंबई, 26 डिसेंबर WH NEWS
    भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

    आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना लाभो, अशी मी प्रार्थना करतो.

  • देशाचा कोहिनूर हिरा हरपला – डॉ. नितीन राऊत  – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन; शोक व्यक्त केला

    देशाचा कोहिनूर हिरा हरपला – डॉ. नितीन राऊत – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन; शोक व्यक्त केला

    देशाचा कोहिनूर हिरा हरपला – डॉ. नितीन राऊत

    – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन; शोक व्यक्त केला

    नागपूर/मुंबई, ब्युरो 
    भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या अखेरचा श्वास घेतला. त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झाल्याची बातमी धक्कादायक आणि दुःखद आहे. देशाच्या आर्थिक उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. यावेळी देशाचा कोहिनूर हिरा हरपल्याचे सांगून काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शोक व्यक्त केला.

    सरत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात कोट्यवधी देशवासीयांच्या मनाला चटका देणारी ही बातमी आहे.
    ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित होते. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण घेतले होते. त्यांनी 1957 ते 1965 या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले.
    मनमोहन सिंह 1969-71 या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर 1976 मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे 1982 ते 1085 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर 1985-87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. तसेच 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

    1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली.
    भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेले मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे, त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना आहेत. अश्या शब्दात डॉ. राऊत यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

  • पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह का दिल्ली के एम्स में निधन. किया आखरी सलाम, 92 वे साल में निधन 

    पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह का दिल्ली के एम्स में निधन. किया आखरी सलाम, 92 वे साल में निधन 

    पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह का दिल्ली के एम्स में निधन. किया आखरी सलाम, 92 वे साल में निधन 

    दिल्ली ब्युरो – देश के पूर्व प्रधानमंत्री और भारत के प्रख्यात अर्थशास्त्री डॉ. मनमोहन सिंह का गुरुवार देर रात निधन हो गया. उन्होंने 92 साल की उम्र में आखिरी सांस ली. देर शाम तबीयत बिगड़ने के बाद उन्हें एम्स के इमरजेंसी विभाग में भर्ती कराया गया था. डॉ. मनमोहन सिंह के नाम कई उपलब्धियां हैं. आर्थिक उदारीकरण में उनका विशेष योगदान रहा.

    डॉ. मनमोहन सिंह ने वित्त मंत्री के रूप में कार्य करते हुए साल 1991 में शुरू किए गए आर्थिक उदारीकरण में महत्वपूर्ण भूमिका निभाई थी. इसमें सरकारी नियंत्रण को कम करना, प्रत्यक्ष विदेशी निवेश (FDI) को बढ़ाना और स्ट्रक्चरल रिफॉर्म्स को लागू करना शामिल था, जिसने भारत की अर्थव्यवस्था को वैश्विक बाजारों के लिए खोल दिया था.

    मनमोहन सिंह की जीवनी.!
    डॉ.मनमोहन सिंह(२६ सप्टेंबर, १९३२ – २६ डिसेंबर, २०२४)  २२ मे २००४ से २६ मे २०१४तक  भारत के पंतप्रधान थे . वे १४वे पंतप्रधान the. वह काँग्रेस पक्ष के सदस्य और राज्यसभा में  आसाम के  प्रतिनिधित्व करते the. इसके पहले वे इ.स. १९९१ को  पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडल में केंद्रीय अर्थमंत्री रहें . उस वक्त उनोने किए आर्थिक सुधारणा तबसे  आर्थिक स्थिती में सुधार होणे से उनकी प्रतिमा राजनीतिक तौर पर बडी बनी.

    जन्मतारीख: २६ सप्टेंबर, १९३२
    जन्मस्थळ: गाह,पाकिस्तान, पाकिस्तान
    शिक्षण: नफील्ड कॉलेज (१९६०–१९६२), सेंट जॉन्स कॉलेज (१९५६–१९५७) ·पहले पदे: राज्यसभा सदस्य (२०१९–२०२४), भारताचे परराष्ट्रमंत्री (२००५–२००६) ·
    पुरस्कार: इंदिरा गांधी शांती पुरस्कार .
    वंशज: उपिंदर सिंग, अमरीत सिंग, दमन सिंगसंस्था स्थापना: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ·

  • डॉ. मनीष गवई महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी..! अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले नियुक्तीचे पत्र

    डॉ. मनीष गवई महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी..! अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले नियुक्तीचे पत्र

    डॉ. मनीष गवई महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी..!
    अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले नियुक्तीचे पत्र
    नागपूर : अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा आंतरराष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य डॉ. मनीष गवई यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड करण्यात आली. अमरावतीचे जिल्हाधिकरी सौरभ कटियार यांनी त्यांच्या निवडीचे पत्र नुकतेच प्रदान केले. युवकांना सशक्त करण्यासाठी देशभर व देशाच्या बाहेरही जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. गवई यांनी युवकांना सशक्त करण्याचे काम गेल्या २० ते २५ वर्षांपासून केले आहे. युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, सर्वधर्म समभाव, विश्व शांतीकरिता युवा विचारप्रणालीकरिता

    आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील या विषयाला घेऊन त्यांनी चीन, नेपाळ, थायलंड, भूतान, रशियासह सार्क देशात युवा शक्तीकरणाबाबत प्रभावी कार्य केले असून, त्यांनी राष्ट्रबांधणीत, राष्ट्रविकासात युवकाचा सहभाग, युवा सह-विचार आदान प्रदान, विश्व मैत्रीकरिता युवा विचारांची गरज यावर प्रकाश टाकला आहे. तसेच देशाच्या विकासात युवकांची भूमिका यावर सार्क देशात भक्कम बाजू मांडली आहे. युवकांना जागृत करण्यासाठी त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांचे व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजनदेखील केले आहे. विशेष म्हणजे हा सन्मान प्राप्त करणारे ते सर्वात कमी वयाचे युवक आहेत. त्यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक पुढच्या पाच वर्षासाठी करण्यात आली आहे.

  • अवैध धान तस्कर नियंत्रण पथकाच्या ताब्यात  ◼️6.60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धान तस्कर नियंत्रण पथकाच्या ताब्यात ◼️6.60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धान तस्कर नियंत्रण पथकाच्या ताब्यात

    ◼️6.60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    गोंदिया : जिल्ह्यातील देवरी येथून धान खरेदी करून चिचगड-ककोडी मार्गे छत्तीसगड राज्यातील हातबंजारी येथे नेत असलेला ट्रक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव लोकेश सोनुले आणि त्यांच्या उड्डाण पथकाने 24 डिसेंबर रोजी दुपारी 2.40 च्या सुमारास पकडला. या कारवाईत धानाची 200 पोती व ट्रक असा एकूण 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार, कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीचे नियंत्रण पथक आपले कार्यक्षेत्र देवरी व सालेकसा परिसरात अवैध धान खरेदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्तीवर असताना मंगळवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास देवरी-चिचगड-ककोडी मार्गावरील गणुटोला येथे दुपारी ट्रक क्र. सीजी 08 – V 6015 ची तपासणी करण्यात आली. यावेळी हातबंजारी (छत्तीसगड) येथील रहिवासी ट्रक मालक माणिक शाहू हा बेकायदेशीरपणे देवरी येथून धान खरेदी करून चालकाच्या मदतीने छत्तीसगड राज्यातील हातबंजारी येथे नेत असल्याचे आढळून आले.

    दरम्यान, कृउबास देवरीचे सचिव लोकेश सोनुले व त्यांच्या पथकाने कारवाई करून वाहन ताब्यात घेतले. सोनुले यांच्या या कारवाईने देवरी व सालेकसा तालुक्यातील अवैध धान खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून या कारवाईत 1 लाख 60 हजार रुपये किमतीचे 200 पोती धान व 5 लाख रुपये किंमतीचे ट्रक असा 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाई बाजार समितीचे नियंत्रण पथक करीत आहे.