असलेल्या आंदोलनाला पालकमंत्री बावनकुळे यांची भेट; लवकरच निर्णयाची अपेक्षा
– मुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रश्न निकाली काढणार-बावनकुळे
डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल पार्कचे भूमिपूजन होत नही तो पर्यत आंदोलन सोडणार नाही-चंदू पाटील
नागपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीच्या वतीने नारा येथील पार्क संदर्भातील सुरू असलेल्या आंदोलनाला १४ एप्रिल रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे महसूल व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत मा.राजेश रंगारी ही उपस्थित होते.
या प्रसंगी समितीचे अध्यक्ष चंदू पाटील यांनी १९९६ पासून २०२५ पर्यंत पार्क संदर्भात शासन पातळीवर घेण्यात आलेले निर्णय सविस्तरपणे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उपस्थित जनसमुदाया समोर सविस्तर समजावून सांगितले.डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल पार्कचे भूमिपूजन होत नही तो पर्यत आंदोलन सोडणार नाही असा ईशाराही चंदू पाटील यांनी दिला.
त्यानंतर शशिकला चालखुरे यांनी स्वत: लिहिलेले पार्कसंबंधी गीत सादर केले.आपल्या भाषणात पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यभरात भारतीय संविधानाची प्रस्तावना घराघरांत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कच्या उभारणीविषयी बोलताना त्यांनी नमूद केले की, जर नागपूर सुधार प्रन्यासने वेळेत हे काम पूर्ण केले असते, तर फारच कमी खर्चात पार्क साकारले गेले असते. सध्याच्या स्थितीत पार्कसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असून, लवकरच सामाजिक न्याय विभागाचे मंत्री व समिती प्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन पुढील चर्चा मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर नागपूरातील जनतेच्या भावना लक्षात घेता, हा प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावा अशी शिफारस मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात येईल, असेही पालकमंत्री बावनकुळे यांनी आश्वासन दिले.
मंत्री महोदयांनी उपोषण करणाऱ्या महिलांशीही संवाद साधला आणि त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यमुनाबाई रामटेके, वनिता वालदे, अलका रक्षित, रेखा खोब्रागडे, विजया पाटील, वाच्छला बेले,यांनी यावेळी मंत्री महोदयांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जोपर्यंत पार्कचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत मी येथून हलणार नाही. आम्हाला मरण आले तरी चालेल, पण मी इथून जाणार नाही.”
या भेटीनंतर भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला. समितीच्या कार्यकर्त्यांनी हजारो उपस्थितांना भोजनदान केले. या उपक्रमात अजय खोब्रागडे, प्रफुल्ल खोब्रागडे, आनंद वाघमारे, रवि चौहान, बोनी वालदे, गजानन जांगळे, आनंद शेंडे, उमेश कावळे, अरविंद बागडे, राजेश पाटील, सतीश गौर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन सुषमा नागरे-कांबळे यांनी केले. अॅड. शैलेश नारनवरे यांनी कोर्टात चालू असलेल्या प्रकरणाची माहिती दिली. मा.मोरे साहेबांनी आपल्या भाषणात आंबेडकरी समाजाने पुढे काय करावे यावर मार्गदर्शन केले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत गौतम पाटील, राजेश रंगारी यांनी केले.
तर अॅड. शैलेश नारनवरे यांचे स्वागत अजय खोब्रागडे यांनी केले. आंदोलनस्थळी मंत्री महोदयांना आणण्यासाठी जयश्री सोमकुंवर यांनी विशेष प्रयत्न केले.
गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला प्रथमच जनतेतून व अधिकाऱ्यांकडून ठोस प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. काही राजकीय स्वार्थासाठी आंदोलनाचे विघटन करण्याचे प्रयत्न झाले, मात्र समितीच्या निस्वार्थ कार्यकर्त्यांमुळे हे प्रयत्न अपयशी ठरले. मागील सात महिन्यांपासून सुरू असलेले हे आंदोलन १४ एप्रिल रोजी कोणताही वादविवाद न होता यशस्वीपणे पार पडले.आता पालकमंत्री बावनकुळे किती लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन किती लवकर हा प्रश्न निकाली काढेल या कडे संपूर्ण आंबेडकरी जनतेचे लक्ष लागले आहे.